संत तुकाराम महाराज जीवन चरित्र माहिती मराठी | Sant Tukaram information in Marathi

सर्व वारकरी आणि वारकरी संप्रदायातील सर्व बांधवाना नमस्कार. आज आपण Sant Tukaram information in Marathi या लेखात संत तुकाराम यांच्याविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सोबत संत तुकाराम महाराज जीवन चरित्र, संत तुकाराम माहिती मराठी, संत तुकाराम महाराज अभंग व अर्थ यांचा पण विचार करणार आहोत.

Sant Tukaram information in Marathi:

संत तुकाराम हे सत्तराव्या शतकातील एक वारकरी संत कवी होते. त्यांचा जन्म २२ जानेवारी १६०८ रोजी देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपुरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. जगद्गुरू तुकाराम हे लोककवी होते.

वारकरी संप्रदायातील प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी- पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय, असा जयघोष करतात.

‘जे का रंजले गांजले !
त्यासी म्हणे जो आपुले !
तोचि साधू ओळखावा !
देव तेथेची जाणावा’ !

अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखविला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराज यांचा उल्लेख केला जातो. संत तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड अणि वेळ प्रासंगिक समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते.

महाराष्ट्राच्या भूमिमध्ये त्या काळात अनागोंदी कारभार निर्माण झालेला होता. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन केले. संत तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवि होते. वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतुन सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हंटला की तो फक्त तुकारामाचाच’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली होती. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्या नित्य पाठात आहेत.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महदभाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या ह्रदयात अभंगरूपाने ते स्थिरावलेले आहेत. त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकलेत पाझरते. त्यांची प्रत्यक्ष अनुभुती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबर गवळणीही रचल्या आहेत. संत तुकारामांच्या अभंगांचा अनेकांनी अनेक अंगांनी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

संत तुकाराम महाराज जीवन चरित्र माहिती मराठी – Sant Tukaram information in Marathi

महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखामध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणार्‍यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते.

बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचा काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते.

वि. का. राजवाडे यांनी संत चळवळीवर काही प्रमाणात टीका केलेली आहे. संत चळवळीच्या संदर्भामध्ये ते लिहितात, “संतांच्या संत चळवळीने महाराष्ट्र तीन शतके अपंग होऊन राहिला मात्र याला अपवाद संत रामदास हे होय” ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीस खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेला आहे.

तुकारामांच्या जीवन वर्षाबदल इतिहासमध्ये मतभेद आहेत, त्यातील चार संभाव्य वर्षे इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ , इ.स. १५९८ ही आहेत. इ.स. १६५० मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते. त्यांचे घराणे मोरे अणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठल भक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोलहोबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती. पुण्याचे आप्पाजी गूळवे यांची कन्या आवली हिच्यासोबत त्यांचा प्रथम विवाह झाला होता.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात दुःखे भोगावी लागली. १७ – १८ वर्षाचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले, भयंकर दुष्काळाचा सामना त्यांना करावा लागला. त्यांच्या संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरची आपली परमभक्ति कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्री विठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते.

तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने- कीर्तने करताना तुकारामांना अभंगाची रचना स्फूरू लागली. सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवुन घेण्याचे काम केले.

संत तुकाराम महाराज जीवन चरित्र माहिती मराठी – Sant Tukaram information in Marathi

पुण्याजवळील वाघोल गावातील रामेश्वर भटानी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवला होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते. माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारे हे जगातील पहिले संत होते.

जगामधे समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तिचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला. तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखांचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालण्यासाठी त्यांनी अभंगाद्वारे माणसाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले.

संत तुकारामांची गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमित गेली चारशे वर्षे मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. ज्ञानोबा, तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरवण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने रचली, त्यांतून तुकाराम सहीसलामत बाहेर पडले.

संत तुकाराम यांना चार मुले होती. कन्या भागीरथी व कशी तर मुले नारायण अणि महादेव. यापैकी दोन आजाराने मरण पावले. संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली, लौकिकाच्या मायाजालात गुंतले नाहीत. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर नांदूरकीचे एक झाड आहे. तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12.02 वाजता तुकाराम वैकुंठाला गेले, त्या वेळी हा नांदूरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो, असे सांगितले जाते.

संत तुकाराम महाराज हे देहू गावी जन्मले. संत तुकाराम महाराजांना “जगतगुरु” असे संबोधले जाते. जगतगुरु तुकाराम महाराज हे सदैव “हरीनामात” गढलेले असायचे. होळी नंतर लगेच दुसर्‍या दिवशी “तुकाराम बीज” हा दिवस येतो. याच दिवशी जगतगुरु तुकाराम महाराज हे नांदूरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसुन सदेह वैकुंठधामाला गेले.

वैकुंठधाम म्हणजे साक्षात “श्री हरि भगवान विष्णु” यांचे धाम. जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या नावातच “राम” आहे. “मनुष्याच्या रुपात जन्माला येऊन केवळ आपल्या कर्तृत्वाने व भक्तीने देवत्वाला प्राप्त करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या सारख्या एक युगप्रवर्तक महापुरुषांने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. खरच तुकाराम महाराज हे “जगतगुरु” होते.

मित्रानो आपणास संत तुकाराम महाराज जीवन चरित्र माहिती मराठी – Sant Tukaram information in Marathi, संत तुकाराम माहिती मराठी, संत तुकाराम महाराज अभंग व अर्थ हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद…

आपण हे पण वाचू शकता…

१) महाराष्टाचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.

२) महाराष्टाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख.

३) संत रामदासस्वामी जीवन परिचय.

Leave a Comment